१९ मार्चला डाक अदालतीचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : भारतीय डाक विभाग, वर्धाद्वारे १९ मार्च रोजी अधीक्षक डाकघर कार्यालयामध्ये सकाळी ११.३० वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
ज्या नागरिकांना पोस्टाच्या कामासंबंधी काही तक्रारी असतील व त्याचे सहा आठवड्याच्या आत निराकरण झाले नसेल किंवा समाधारकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारीची डाक अदालतमध्ये दखल घेतल्या जाणार आहे. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर संबंधिच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.
तक्रारीत सर्व तपशीलाचा उल्लेख असावा. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर, वर्धा यांच्या नावाने १५ मार्च अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा बेतानी पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही तसेच तक्रारकर्त्यांना डाक अदालतसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल, असे डाकघर अधीक्षकांनी कळविले आहे.
News - Wardha